खरे प्रेम करूनही आणि त्यास जपूनही आपली कधी कधी काहीच कीम्मत नाही उरत....त्यासाठी ही एक कविता...
पाहिले रडताना मी एकाला
जणू काही बघितलेच मी स्वताला...
असाच एके काळी मी हि रडत होतो
आपल्यातल्या या दुराव्याला मी कोसत होतो...
क्षणो-क्षणी साथ तुला देत होतो
असे होऊनही तुझ्या हृदयातून मी उतरत होतो...
होतो मी फक्त तुझ्या प्रेमाचा भुकेला
तुला सदा हसत पाहायचे हेच लक्ष्य
होते माझ्या जीवनाला...
संकटाची जाणीव तुला कधी होऊ दिली नाही
दुखाची ती झळ तुजपर्यंत कधी पोहचू दिली नाही...
काचेच्या पात्राला जपावे जसे...
त्याहून अधिक तुला मी जपले...
तुझे हास्य कधी मुरणार नाही
यासाठी सारे आयुष्य मी वेचले....
पाहत होतीस तू मला होणारा तो त्रास...
तरीही मजपासून दूर जायचे ...
सोडला नाही तू हा अट्टाहास...
सांग मला दुराव्याने कोणाचे झाले भले...
रडूनी तुझ्या आठवणीत डोळेहि माझे थकले...
रात्रीचे जगणे..कोठेही रडणे..
न कामावर जाणे..न स्वताकडे पाहणे..
काय माझी अवस्था झाली...
तुला दिलेल्या या सुखी जीवनात...
काय माझी कीम्मत उरली.....नाही माझी कीम्मत ठेवलीस....
----------------------शिरीष सप्रे(१७-१२-२००९)-----------------------
No comments:
Post a Comment