Tuesday, July 17, 2012

अंत त्या कवीचा तू करू नकोस...

लिखाणास लेखणी सज्ज होती
पाने वहीची फडफडत होती..
मनात काहूर अनेक विचारांचे
शब्दासी मात्र जाग येत नव्हती...

कोड्यात पडले मन वेडे माझे
ना विचारांचे उलगडले कोडे
लिहिण्यास आज मजपाशी 
ना उरले होते शब्द मजकडे...

क्रोधीत हे मन माझे 
स्वताशीच आज भांडू लागले
कामाच्या या ओघापायी 
का शब्द तू माझे हिरावले...

उतार-चढाव आयुष्यातील 
सहज रित्या पार पाडत गेलास
ना पहिले कधी मागे वळूनी तू
पण या शब्दां पासून तू दुरावालास...

होते तुझेच शब्द सारे वेड्या 
तुझ्याच मनाची व्यथा बोलायचे
ना जाणले कोणी हुंदके मुक्या हृदयाचे 
शब्दच तुझे भाव व्यक्त करायचे...

सहज शब्दांसी गुंफणारा तू 
स्वताच आज तू हरवलास
जन्म घेतला होता कवीने त्या
अन अस्तित्व स्वताचे तू विसरलास...

आहेत तुझेच शब्द अजूनही सारे
त्यांच्या पासुनी तू दुरावू नकोस
आहे जिवंत कवी तुझ्यातला आजही 
अंत त्या कवीचा तू करू नकोस...अंत तू करू नकोस...
------------शिरीष सप्रे(१७-७-२०१२)----------------