Sunday, December 19, 2010

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
क्षणात मी भूतकाळात गेलो
जुन्या आठवणीत मी रमलो
कठीण झाले भावनांना आवरणे
अश्रुनाही मी ना थांबवू शकलो..

सारे काही कालच्यासारखे वाटत होते
रंग आमुच्या प्रेमाचे जेव्हा बहरत होते
होते किती सुखाचे क्षण सारे
डोळ्यासामोरी चित्र उभे राहिले होते...

तिच्या लग्नाची पत्रिका आली..
मानल एक चटका लावूनी गेली
बंद करुनी ठेवल्या होत्या आठवणी
आठवणीना जागे करुनी गेली...

स्पर्श तिच्या प्रेमाचा तो
अजूनही मी विसरलो नव्हतो,
हातावरील रेषात मी आजही
तिचाच हात शोधत होतो...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
वस्तुस्तिथी आज सारी बदललेली होती
कधी काळी माझ्यावर प्रेम करणारी,
लग्नाच्या बंधनात बंधणार होती...

विरहाचा नियतीला दोष देणे
केव्हाच मी बंद केले होते
गाली हास्य तिचे खिलत राहावे
हेच मागणे देवाकडे केले होते...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
थोड्या दिवसात लग्न तिचे होणार होते
साता जन्मांचे बंध जुळणार होते
दुखाची झळ ही तिच्यापर्यंत जावू नये
साकडे हे देवाकडे मी घातले होते...
------------शिरीष सप्रे(१९-१२-२०१०)----------

Wednesday, December 15, 2010

शेवटची भेट मजसी न कळाली...

शेवटची भेट ती
आज नियतीने लिहिली होती
कर्दनकाळी रात्र ती
आज आली होती ...

लिखित होता विरह आमुचा
तरीही तो बदलायचा होता
बेरंग होता प्रेमाचा साचा
रंग त्यात भरायचा होता...

शेवटची भेट आमुची
आजही तिथेच होती
थोड्या दिवसाची प्रेमकहाणी
जिथे लिहिण्यात आली होती...

प्रेमाचा गंध तो आज
हवेतुनी नाहीसा झाला होता
जन्माची साथ देणाऱ्या चंद्रानेही
तार्यांचा आज साथ सोडला होता...

प्रेमाचे ते दिवस सारे
आज कोठेतरी हरवले होते
उभे होतो सामोरी आम्ही दोघे
तरीही अंतरावर वाटत होते...

नाही जमणार म्हणुनी
सहज पाठ तिने फिरवली
उभा होता वेडा मी तिच्या प्रतीक्षेत
शेवटची भेट मजसी न कळाली...मजसी न कळाली...
-------------शिरीष सप्रे(१५-१२-२०१०)-----------

Tuesday, December 14, 2010

तुझेच मला व्हायचे आहे...

मृगनयनी प्रिये तू
नयनात मला पहायचे आहे
एकांतातील विचार बनुनी
आज मला सतवायचे आहे..

हास्य त्या गालावरी
आज पुन्हा खिलवायचे आहे
बनुनी पुन्हा कारण हास्याचे
आज तुला हसवायचे आहे

हातात घेउनी हात तुझा
जग सारे दाखवायचे आहे
प्रेमाच्या त्या घरात प्रिये
तुझेच रूप पहायचे आहे...

घेउनी मिठीत आज पुन्हा
प्रेमाची उब ती द्यायची आहे
विलीन होऊनी जा तू हि प्रिये
तुझी दुखे सारी मला घ्यायची आहे...

विरहाचे अंतर आपल्यातील
आज मला मिटवायचे आहे
साधुनी जवळीकता आज प्रिये
तुझेच मला व्हायचे आहे...
---------------शिरीष सप्रे(१४-१२-२०१०)---------------

Wednesday, December 8, 2010

तू ONLINE आलीस की

तू ONLINE आलीस की
VISIBLE मी होतो..
राहुनी INVISIBLE सदा
तुझीच वाट पाहत असतो...

तू ONLINE आलीस की
BUSY चा STATUS मी लावतो
नाही कोण त्रास देत मला अन
तुझ्याशी तासंतास मी बोलतो...

तू ONLINE आलीस की
मोबाईल माझा SILENT वर जातो
तुझ्याशी CHAT करताना मला
कोणाचाही फोन नको असतो...

हसण्याचा SMILEY तू पाठवता
मनात आनंदाचा लाडू फुटतो
अशीच गोड हसत अशील तुही सदा
या विचारात मग स्वप्ने मी रंगवतो...

गुड बाय चे SMILEY तुझे
मनाला थोडे दुखी करते
OFFLINE तू कधी जाऊ नये
वेडी इच्छा मनाला असते...

CHAT आपले SAVE करून
रात्रोरात्र वाचत मी बसतो
मनात निराळी ओढ असते
जणू तुझ्याशीच मी बोलत असतो...

तू ONLINE आलीस की
वेगळ्याच विश्वात मी वावरतो
विसरुनी जातो वास्तविकता मी
NET च्या दुनियेत मी हरवतो...मी हरवतो....
-------------शिरीष सप्रे(८-१२-२०१०)----------------

Tuesday, December 7, 2010

बोलतात सारे आम्ही टपोरी...

ए साला काय पोरगी...
अशीच आपन कि भाषा
हीच आपन के मू कि बोली
बोलतात सारे आम्ही टपोरी..

नाक्यावरचे आम्ही पडीक
मळकट टी-शर्ट एक जीन्स
सलाम ठोकतात फेरीवाले सारे
आम्हीच या एरियाचे किंग...

सकाळ होताच नाक्यावर हजेरी
रात्रीशिवाय ना घराकडे फेरी
सभ्य लोकांसाठी आम्ही वैरी
बोलतात सारे आम्ही टपोरी...

हिला पहायचे,तिला छेडायाचे
प्रत्येकीवर सदा कमेंट्स करायचे
मुलीही टाळतात त्या नाक्यावरील फेरी..
बोलतात सारे आम्ही टपोरी...

भविष्याचे टेन्शन का घ्यायचे
मदमस्त आपले जीवन जगायचे
नडेल का कोण ते बघायचे
साला टपोरीगिरी करत सदा फिरायचे...

राडा झाला कि गाड्या निघतात
नडणार्याला मारायला धावतात
आम्हाला हात लावायला कोण हिम्मत करी
बोलतात सारे आम्ही टपोरी....

आम्ही ही चांगले कधी काळी होतो
दुनियेच्या काफिरीला थकलो होतो
चांगली दुनिया आमुची झाले वैरी
बोलतात सारे आम्ही टपोरी...आम्ही टपोरी...
-----------शिरीष सप्रे(७-१२-२०१०)-------------

Sunday, December 5, 2010

पैंजणे ही आज वाट पाहत आहे...

घराला घरपण प्रिये
यायचे तुझ्या आगमनाने
नांदून उठायचे घर सारे
कोमल पायातील पैंजणानच्या आवाजाने...

ताल - सूर , लय बद्ध
होती चाल तुझी
छन छन घुमायचा नाद सर्वत्र
अन छेडायाची तार हृदयाची...

सा- रे , रे -ग , ग - म , म - प
स्वर सारे पायी तुझ्या नांदायचे
हर्षित व्हायचे घर सारे
तुझे पैंजण जेव्हा वाजायचे...

आज हरवले स्वर सारे
सूर -ताल हि आज बिघडला
राहिले आठवणीत पैंजण तुझे
साथ माझा तू जेव्हा सोडीला...

आज हि नाद पैंजणांचा
सार्या घरात घुमत आहे
परतशील का प्रिये तू
पैंजणे ही आज वाट पाहत आहे...
------------शिरीष सप्रे(५-१२-२०१०)---------

Wednesday, November 24, 2010

लिहायला विषयच मात्र मिळत नव्हता...

वहीची पाने आज फडफडत होती
लिहावे काहीतरी..इशारा असा करत होती

शब्दही आज रुसले होते
स्वताच्या अर्थापासून आज दूर गेले होते

मनात विचारांचा गोंधळ होता
शब्दांना काव्यात गुंफण्याचा मेळ घडत नव्हता...

काहीतरी लिहिण्याची इच्छा मनात दाट होती
लिहावे कशावरी..याचीच खात्री मनाला होत नव्हती...

मनातील विचारांना आज नवा सूर गवसला होता
काव्यात मांडताना शब्दांची लय तो बिघडवत होता...

मनात विचारांचे काहूर माजले होते
मनातून उतरवायला शब्द मात्र उमजत नव्हते...

लेखणी हातातील लिखाणास आतुरली होती
लिहावे कसे...शब्दांनीही आज साथ सोडली होती...

वेड्या मनाने माझ्या, आज कहर केला होता
लिहायचे होते फार काही..पण लिहायला विषयच मात्र मिळत नव्हता...विषयच मात्र मिळत नव्हता...
------------------शिरीष सप्रे(२४-११-२०१०)-----------------

Sunday, November 7, 2010

शेवटची कविता मी लिहिली...

गुंफला होता शब्द प्रेमाचा
आज शब्द तो अधुरा राहिला...

होतो लिहित कहाणी प्रेमाची
आज कहाणी ती अधुरी राहिली...

प्रेमाच्या सागरात नौका आपल्या नावाची सोडली
अर्ध्या वाटेत नौका ही आज बुडाली...

तयारीत होता सूर्य नवी पहाट आणायला
काळोख्या रात्रींशी मैत्री माझी झाली...

डोळ्यात स्वप्नांची उमेद नवी होती
जागा त्या स्वप्नांची अश्रूंनी आज घेतली...

हसत पाहायचो वास्तवात सदा मी
आज तीच एक आठवण बनुनी राहिली...

लिखित होता विरह नशिबी माझ्या
नशिबाच्या विरोधात प्रेमाची हाव मी केली...

जुळवत होतो शब्दांना प्रेमाच्या भावनेसाठी
त्या शब्दांनीच आज प्रेमाची सांगता केली...

जुळणार नाही शब्द कवितेसाठी..न मिळणार साथ पुन्हा कधी
उरली साथ काही क्षणांपुरती ...अन...
शेवटची कविता मी लिहिली... शेवटची कविता मी लिहिली...
-----------------शिरीष सप्रे(०७-११-२०१०)--------------------------

Sunday, October 31, 2010

आज ती ही परतली...

आठवणी काही लपल्या होत्या
मनात माझ्या दडल्या होत्या...

विचार मनात एकच असायचा
तो विचारही मी थांबवला होता...

एकांत मी जीवनी गाठला होता
माझ्याच नशिबाला दोष दिला होता...

गार्हाणे माझे देवाने आज ऐकले
बसला नाही विश्वास, प्रेम माझे परतले...

शेवटची भेट ध्यानात ठेवली होती
आठवण तिची तशी रोज येत होती...

स्वप्न माझे वास्तवात दिसत होते
आज प्रेम माझे परतुनी येत होते...

येईल का पुन्हा ती प्रश्न हा मनी होता
ती परतण्याचा विचार माझ्या ध्यानीही नव्हता...

माझ्या प्रेमाची आर्तता तिला कळाली
तोडूनी बंधने सारे आज मजकडे ती परतली...

खर्या प्रेमाची परीक्षा देव घेत असतो
प्रेमाच्या पावित्रतेला सदा तो पारखत असतो...

आनंदाची लहर अशी जीवनी माझ्या आली
प्रेमाच्या कळीची आज फुले झाली...

प्रेमाची साथ मी कधी ना सोडली
प्रेमाला साथ द्यायला आज ती ही परतली...आज ती ही परतली...
------------शिरीष सप्रे(३१-१०-२०१०)----------------

Tuesday, October 19, 2010

ONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे...

G - TALK वर माझ्या असा एक ping आला
भटकलेल्या वाटसरूला जसा नवा रस्ता मिळाला...

तास तास वाट ती ONLINE येण्याची पाहायचो
तिच्याशी गप्पा मारताना वेगळ्याच दुनियेत मी जायचो...

महत्वाची कामे सारी बाजूला सरायची
सखी ONLINE आली कि शब्दांचीही कविता बनायची...

ऑफिसात धाव माझी तिच्याशी CHAT करण्यास असायची
ऑफिसच्या कामांना कसली हो घाई असायची...

दुखाची ओझी सारी कधी जड वाटायची..
तिच्याशी ONLINE बोलताना हास्याची कळी गाली उमलायची...

तिला SMILEYS पाठवताना हुरहूर मनाला लागायची
वेडे मन माझे तिच्या SMILEY ची आतुरतेने वाट पहायची...

चे ठोके पडताच तिच्या OFFLINE जाण्याची भीती असायची...
रात्र तिच्याच विचारात घालवत ती ONLINE येण्याची वाट पहायची...

कधी ही पाहिलेल्या व्यक्तीवर अशी प्रीत जडावी...
अशी ONLINE सखी अचानक काळजाला भिडावी...

INTERNET या अशी जादूची छडी फिरवली
स्वप्नांच्या दुनियेतील तिच्याशी ONLINE भेट घडवली...

सौंदर्यावर भूळूनी प्रेम करणारे..प्रेमी असे खूप आहे..
पण ONLINE प्रेम करणारा प्रेमी मात्र मीच आहे...प्रेमी मात्र मीच आहे...
-------------शिरीष सप्रे(१९-१०-२०१०)-----------------------

Thursday, October 14, 2010

आलो मी परतुनी...

आलो मी परतुनी
शब्दांना कवितेत मांडाया..

आलो मी परतुनी
हृदयाची तार छेडाया..

आलो मी परतुनी
प्रियेला प्रीत सांगाया..

आलो मी परतुनी
सुखांना कंठी बांधाया..

आलो मी परतुनी
अश्रू ते सारे पुसाया..

आलो मी परतुनी
हास्य ओठी आणाया..

आलो मी परतुनी
जीवनात रंग भरावया..

आलो मी परतुनी
स्वप्नांना त्या बांधाया..

आलो मी परतुनी
एक गोड स्वप्न बनाया...एक गोड स्वप्न बनाया.....
-------------शिरीष सप्रे(१४-१०-२०१०)-----------------

Wednesday, September 22, 2010

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहा वाला पाहून हसला
"बहोत दिनो के बाद साहब" म्हणुनी पुसले..
खूप दिवसांनी का होईना,
चेहरा माझा त्याने ओळखला...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
दुकान त्याचे तसेच होते,
चहाचे ग्लास हि तेच होते
आहेस तू हि माझ्याबरोबर
भास हे मला होत होते...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
पावसाची ती सर लागली होती,
चहा पिणार्यांची ती गर्दी होती..
मी हि एका आडोशाला होतो
गर्दीत त्या तुला शोधत होतो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
सिगारेटचे झुरके कोण सोडत होते
कोणी सिगारेट शिलगावत होते...
सिगारेट घ्यायला पाऊले माझी जात होती..
पण तेव्हा मला अडवणारी मात्र तू नव्हती...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहाचा आस्वाद घेणारे सारे होते,
सुरके मारत सारे चहा पीत होते
वाफाळत्या चहाचा ग्लास माझ्या हाती होता,
चहाच्या त्या वाफेतही तुझ्याच गंधाचा भास होता...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
आपले बाकडे हि तसेच होते
नाव ज्यावर आपण कोरले होते..
बाकड्यावर त्या आज मी एकटा होतो,
येशील तू कधीतरी याचीच स्वप्ने पाहत होतो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहाचे पैसे पुढे देण्यास गेलो
" मेडम नही आज..? " या प्रश्नाला ना उत्तरलो..
डोळे माझे भलतेच सांगत होते...
नाहीस तू बरोबर चहावाल्यालाही हे कळले होते...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
आठवणीना त्या आपुल्या
पावसात भिजवायला गेलो...
सरीत त्या अश्रुना लपवायला गेलो...
आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
------------शिरीष सप्रे(२२-९-२०१०)------------------

Tuesday, September 21, 2010

जिवंतपणे मला मारुनी गेली...

प्रेमाचे ते शब्द गुंफता गुंफता
शब्दांना त्या अर्थहीन करुनी गेली...

प्रेमाची प्रीत गाता गाता तू
प्रीत ती अबोल करुनी गेली...

उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहताना
डोळ्यांना अश्रूत बुडवुनी गेली...

नव्या दिवसाची वाट पाहत असताना
काळाला तिथेच थांबवूनी गेली...

आशेचा किरण जीवनात पाहताना
जीवनच अंधारमय करुनी गेली...

सात जन्माचे वचन देता देता
पहिलेच वचन तोडूनी गेली...

चंद्रात तुझा चेहरा पाहत असताना
अमावस्या आकाशी करुनी गेली...

सुखाची कुठे चाहूल लागत असताना
दुखाचे वार मजवरी करुनी गेली...

परतफेड माझ्या प्रेमाची करुनी तू
जिवंतपणे मला मारुनी गेली...जिवंतपणे मला मारुनी गेली...
------------शिरीष सप्रे(२१-९-२०१०)-------------

Monday, September 20, 2010

गीत हे गातील वारे...

प्रेमाचे आपुल्या वाहतील झरे
प्रेमाचा आस्वाद घेतील सारे
प्रेमाला जेव्हा समजतील सारे
प्रेमाचे गीत हे तेव्हा गातील वारे...

विरोधकांसाठी बंद होतील द्वारे
जेव्हा प्रेमासाठी खुलतील द्वारे
प्रेमाच्या दुनियेत राहतील सारे
अन प्रेमाचे गीत हे गातील वारे...

प्रेमाचा गंध दरवळेल वातावरणी
गंध प्रेमाचा अनुभवतील सारे..
शत्रूत्वास आज विसरतील सारे
प्रेमाचे गीत जेव्हा गातील वारे...

शत्रूत्वास या कोणीही न पुसले
प्रेमाचेच पारडे जड सदा दिसले
निस्वार्थी प्रेम करूयात सारे
प्रेमाचे गीत हे तेव्हा गातील वारे....

प्रेमाला या सीमा न कुठली
गोष्ट प्रेमाचीच सदा रंगली
करूयात वर्षाव प्रेमाचाच सारे
प्रेमाचे गीत हे तेव्हा गातील वारे....प्रेमाचे गीत हे तेव्हा गातील वारे....
------------शिरीष सप्रे(२०-९-२०१०)---------------

Saturday, September 18, 2010

लाखात एक म्हणुनी ओळखला तू जाणार...

लाखात एक मनुष्य जन्मतो
कष्ट करूनही अपयश मिळवतो
दुखांचा डोंगर सदा सामोरी असतो
सुख या शब्दालाही तो मुकतो....

ओझी दुसर्यांची वाहता वाहता तो
स्वताचे दुख हास्यामागे लपवतो
असते गरज त्यालाही एका साथीची
नसते कोणी तेव्हा..एकांतात तो रडतो....

अस्तित्व स्वताचे शोधण्यासी
जीवाचा आटापिटा तो करतो
व्यर्थ जातात कष्ट सारे सदा त्याचे
अन देवही त्याची मजा घेत असतो...

त्याच्या मुक्या हृदयाचे हुंदके
आज त्याने सांगावे कोणाला
आहे शोधात तोही एका साथीच्या
व्यथा त्या मनाची कळावी कोणाला...

अपयशाच्या खडतर प्रवासात या
यशाचा रस्ता जरूर तुला दिसणार
ठेव जिद्द मनात तू युद्ध हे तू जिंकणार ..
लाखात एक म्हणुनी ओळखला तू जाणार...लाखात एक म्हणुनी ओळखला तू जाणार...
--------------शिरीष सप्रे(१८-९-२०१०)------------------------------

Sunday, September 12, 2010

देवा का तू माझ्याशी वैर केले..

आले आले गणपती आले..
सुख अन समृद्धी घेउनी आले..
मनोकामना पूर्ण करण्यास भक्तांच्या
आशीर्वाद सारे घेउनी आले..

मनोकामना माझी पूर्ण होण्यास
उपास तापास सारे मी केले
देवालाच नको हवे होते सुख माझे
दुर्लक्ष सदा त्याने माझ्या कडे केले...

मंदिरे सारी पालथी घातली
नवसांची ती मी शिखरे गाठली
भक्तांच्या गणनेत मला न मोजले
प्रार्थनेस त्या कधी न पूर्ण केले

तिच्या सुखाचीच मागणी सदा
निस्वार्थी पणे तुझ्याकडे केली
देशील का रे उत्तर देवा मला तू
भक्तांमध्ये माझी गणना का न तू केली..

भक्तास या तू सदा रडवले
समोरच उभा होतो..तरीही न पहिले
जाता जाता एक विचारतो देवा तुला
देवा का तू माझ्याशी वैर केले...का तू माझ्याशी वैर केले...
---------------शिरीष सप्रे(११-९-२०१०)---------------

Tuesday, August 31, 2010

आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत....

ब्रम्हांडी एकदा चर्चा झाली
सार्या देवांची बैठक झाली
आळस अस्त्र सोडूनी धरतीवर
मनुष्यास अद्दल घडविण्यात आली...

आळस अस्त्राचा कहर असा झाला
मनुष्य त्यापुढे हतबल झाला
निद्रे पुढे काही सुचेनासे झाले
पृथ्वीतलावावर आळसाने वर्चस्व गाजवले...

टाळं टाळ करण्याची सुरुवात झाली
तारखा पुढे ढकलण्याची सवय जडली
हातील कामे काही लवकर उरकेना
आळसा पुढे त्यांसी काही सुचेना...

जबाबदारीची जाणीव ती नाहीशी झाली
बेफिकीर पणाने मनुष्याशी मैत्री केली
आळस अजात शत्रूसी दूर न त्याने केले
आज आळसास सर्वात जवळचे त्याने केले...

चुकांची जाणीव होईलही त्याला एकदा
वेळ लागेल निसटुनी हातुनी जेव्हा
आयुष्यात चुकांचे डोंगर पार केले
आळसास जेव्हा जवळी त्याने केले...

उठ मनुष्या तू..झटक आळस आत्ता
आहे हाथी वेळ अजूनही..संधी दवडू नकोस आत्ता
कष्टानेच तर जग सारे जिंकायचं असत
आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत...आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत.......
----------------शिरीष सप्रे(३१-०८-२०१०)-----------------

गर्दीत या मी एकटा चालत राही..

असह्य वेदना सहन मी करी
सांगावे कोणाला देवही मजा घेई
दिवस असे कि मी न माझा राही
गर्दीत या मी एकटा चालत राही...

असा मी भरकटलेला
दिशांना सार्या विसरलेला
कुठे जायचे यायचे भान नाही
गर्दीत या मी एकटा चालत राही...

मनावर माझ्या स्वताचा ताबा नाही
असलो सर्वांत तरी एकटा राही
माणसांच्या लोंढ्यात हरवलेला मी राही
गर्दीत या मी एकटा चालत राही...

अनेक प्रश्न सामोरी न उलगडलेले
प्रश्न काही असे कधी न समजलेले
उत्तरांच्या शोधात मी भरकटत जाई
गर्दीत या मी एकटा चालत राही...

वाट सामोरी माझ्या कधी न संपणारी
जीवन माझे असे सुखे न मिळणारी
दुखाची घरे माझ्या आगमनाची वाट पाही
गर्दीत या मी एकटा चालत राही...

काळोखी जीवन माझे,कधीतरी संपणार
गर्दीतील मी एकटा..शेवटचा निरोप घेणार
आयुष्याची वात आज विझण्यास पाही
गर्दीत या मी एकटा चालत राही....मी एकटा चालत राही....
-------------------शिरीष सप्रे(३१-८०२०१०)---------------

Sunday, August 29, 2010

बसमधील ती अनामिका ....

८.३० च्या बसला पुन्हा ती गर्दी झाली
लोकांची पाउले बसच्या दिशेने वळाली..
गर्दीत त्या ढकला - ढकली झाली..
गोंधळलेली त्या गर्दीत मला ती दिसली...

सगळ्यांची घाई जागा पकडण्यासाठी होती
गोंधळलेली ती तिच्याच विचारात होती..
बसची रांग हळूहळू पुढे सरत होती..
माझीही पाउले त्याच बससाठी धडपडत होती..

धक्के - बुक्के खात त्या बस मध्ये मी चढलो
चढताच सर्वत्र तिला मी शोधू लागलो..
अनामिका ती मजपासून दूर पुढे उभी होती..
अंतरावर असली तरी माझ्या नजरेसमोर होती..

निरागस तिचा चेहरा..कोण्या एका विचारात होता..
होतोय गर्दीचा त्रास भाव हे चेहऱ्यावर दर्शवित होता..
बसच्या या राक्षसी गर्दीत..प्रथमच ती आली असावी..
ऐश्वर्य अन लाडात कदाचित ती मोठी झालेली असावी..

नजर माझी एकटक तिच्यावरच खिळली होती
पण गर्दीत त्या नजर काही आमुची मिळत नव्हती..
एकटक नजरेने लक्ष तिचे माझ्याकडे वेधले..
तिचा कटाक्ष माझ्याकडे पडताच..ओठी हास्याचे फुल माझ्या खिलले..

काही मिनटांची ओळख जुन्या मैत्री सारखी वाटत होती
नव्हते ठाऊक कधी अनोळखी वर प्रीत माझी जडली होती..
आज या ओळखीस पुढे मला न्यायचे होते
त्या अनामिके सोबत सारे आयुष्य मला घालवायचे होते..

सुखाची ती स्वप्ने काही काळापुरती होती
जेव्हा पाउले तिची उतरण्यासाठी पुढे सरत होती..
उतरताना तिने मजकडे मागे वळूनी पहिले
वेडे मन माझे तिच्या प्रेमातच वाहिले..

रोज मी वेडा असा त्याच बसला असतो
आज तरी येईल ती याचीच वाट पाहत असतो
अनामिकेशी ती भेट त्या दिवसापुरती होती..
प्रेमाची माझी गोष्ट सुरु होण्याआधीच संपली होती...गोष्ट सुरु होण्याआधीच संपली होती...
----------------शिरीष सप्रे(२८-८-२०१०)----------------

Wednesday, August 25, 2010

तू नसताना पाऊस का येतो...

तू नसताना पाऊस का येतो...
आठवणींच्या शिदोरीला माझ्या
हसत तो भिजवुनी जातो..

तू नसताना पाऊस का येतो...
डोळ्यातुनी ओघळणाऱ्या अश्रूला
सरींच्या सोबत घेउनी जातो..

तू नसताना पाऊस का येतो...
दिवसा पाहणार्या स्वप्नांना डोळ्यांदेखत
काळ्या ढगात लपवूनी जातो..

तू नसताना पाऊस का येतो...
रस्त्यावरील तुझ्या पाऊल खुणांना
सहजरीत्या मिटवूनी जातो..

तू नसताना पाऊस का येतो...
तुझ्या जवळी येणाऱ्या मार्गाला
डोळ्यांदेखत धूसर करतो..

तू नसताना पाऊस का येतो...
पावसात अश्रू ढाळणार्याची
बरसुनी तो मजा घेउनी जातो...

तू नसताना पाऊस का येतो...
पडणाऱ्या त्या प्रत्येक थेंबात
तुझाच चेहरा शोधायचा प्रयत्न मी करतो...चेहरा शोधायचा प्रयत्न मी करतो...
----------------शिरीष सप्रे(२४-०८-२०१०)--------------------

Wednesday, August 18, 2010

आज माझे पाकीट हरवले...

आज माझे पाकीट हरवले
.
.
.
होते थोडे फार पैसे
काही माझे कार्डस होते..
त्यात फर्स्टक्लास चा पास ही होता
आणि काही चिटोरे होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
सोबत हरवला तो फोटो
आपण एकत्र काढला होता
हरवला तो एक कागद ज्यावर
तुझ्या प्रेमाचा कबुलीजबाब होता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवली ती सारी तिकिटे
एकत्रित आपण जेथे प्रवास केला होता...
अन त्या तिकीटावरही तू
हसत हिशोब मांडला होता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवली ती गुलाबाची पाकळी
जे फुल तुला मी दिले होते..
माझ्याशी अखेरचा निरोप घेताना
फुल ते हसत परत केले होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवला तो कागद सोबत
ज्यावर तुझ्यासाठी काही कविता केल्या होत्या
होत्या वाचून दाखवायच्या तुला एकदा
पण कवितांना त्या अर्थ राहिला नव्हता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवले ते पत्र सोबत
कधी काळी तुला लिहिले होते..
प्रेमाचे शब्द ऐकण्या अगोदर..
शब्दांनाही तू नाकारले होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
होता तुझा एक फोटो
ज्याच्याशी माझा संवाद असायचा
तुजवरील प्रेम ऐकताना
फोटोही कधीतरी लपून रडायचा...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवल्या त्या आठवणी सार्या
ज्यांच्या आधारे मी जगत होतो..
मिळाले पाकीट तर द्या हो पुन्हा मला
आठवणींविना त्या मी अधुरा होतो....मी अधुरा होतो...
------------शिरीष सप्रे(१८-८-२०१०)-----------------

एका पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला...

मित्रानो सारे प्रेम करतात...काही नशीबवान असतात ज्यांना त्यांचे प्रेम मिळते...आणि काही प्रेमाच्या शोधात असतात...अशाच एका प्रेमापासून दुरावलेल्या प्रेमीची व्यथा कि ब्रेकअप नंतर कसे सारे बदलत जाते......


हसत खेळत तो असायचा
सुखानं जगात वावरायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
नैराश्याच्या घरात राहायचा...

कामासाठी तो धडपडायचा
ऑफिसात सदा वेळेत असायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
वेळेशी त्याचा ताळ-मेळ नसायचा...

मित्रांमध्ये वेळ घालवायचा
स्वताची सर्वांत छाप पाडायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
स्वताच्या अस्तित्वाच्या शोधात असायचा...

घोळक्यात सर्वात उठून दिसायचा
इतरांना ही हवाहवासा वाटायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
गर्दीत हरवलेला असायचा...

मैत्री त्याची सर्वांपेक्षा न्यारी
मदतीसाठी सदा पुढे असायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
स्वताच्या मदतीसाठी धावा करायचा...

आजही तो असा हरवलेला
सुखापासून सध्या दुरावलेला
आहे सारा समुद्र जवळी त्याच्या
तरीही एका पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला....पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला...
-------------शिरीष सप्रे(१८-८-२०१०)----------------

Friday, August 13, 2010

स्वताला सिद्ध तू कर...

डोंगरांमागे सूर्य तो मावळताना
आज काहीतरी खुणावत राहील ..
जाता जाता भरलेला विषाचा
पेला तो बोलवत राहील ...

तिची वाट पाहण्यापेक्षा वेड्या
घसा तुझा ओला तू करशील..
आहे माहित ती येणार नसल्याची
दारूचा पेला तू खलास करशील...

तिच्या आठवणीत रडण्यापेक्षा
नशेत स्वताला हसते करशील..
स्वताच्या चुकीवर हसुनी तू आज..
दारूचा पेला तू खलास करशील...
.
.
.
पण

प्रेम प्रेम घेउनी काय रडतो
स्वतावर आत्ता तू प्रेम कर
खूप केले दुसर्यांसाठी आजवर..
स्वतासाठी जग तू क्षणभर..

तिच्यासाठी रोज झुरण्यापेक्षा
स्वतासाठी तू जगायचा प्रयत्न कर
खूप बाकी आहे आयुष्यात अजुनी
दारूचा पेला तू खलास कर...

आज रडत आलास इथे
शेवटचे तुझे येणे होते
प्यायलास दुखाचे औषध हे
अन शेवटचे तुझे रडणे होते...

उद्या सूर्य उगवताना
नवीन पहाट आणणार आहे...
दारूच्या नशेतील बेधुंद तू..
पुढील आयुष्याचा विचार करणार आहेस..

नवीन पहाट नवीन दिशा
नवी उमेद घेउनी सुरुवात तू कर..
आहेस तुही कर्तबगार असा...
आज स्वताला सिद्ध तू कर....स्वताला सिद्ध तू कर...
--------------शिरीष सप्रे(१३-०८-२०१०)------------------

Thursday, August 12, 2010

खरच कुणीतरी असावे असे..

कुणीतरी असावे असे..
मनातील विचार ओळखणारे..

कुणातरी असावे असे..
ओठांवरी नाव येणारे..

कुणीतरी असावे असे..
डोळ्यातील प्रेम पाहणारे..

कुणातरी असावे असे..
प्रेमाचे गीत ऐकवणारे..

कुणीतरी असावे असे..
बेरंगी जीवनात रंग उधळणारे..

कुणातरी असावे असे..
स्वप्नात येउनी सतावणारे..

कुणीतरी असावे असे..
दिवसाच्या प्रारंभी पहिला विचार बनणारे..

कुणातरी असावे असे..
दुखात सुख बनुनी येणारे..

कुणीतरी असावे असे..
ओठी हास्य उमलवणारे..

कुणीतरी असावे असे..
आयुष्यभराचा हाथ पकडणारे..

कुणीतरी असावे असे..
वचनांची पूर्तता करणारे..

कुणीतरी असावे असे..
कळीचे फुल खिलवणारे..

खरच कुणीतरी असावे असे..
माझ्यासाठीही जगणारे...माझ्यावरी प्रेम करणारे...
------------शिरीष सप्रे(१२-८-२०१०)------------

Wednesday, August 4, 2010

आठवतात का तिला त्या आठवणी..

आले नभ भरुनी ..
दाटतात त्या आठवणी ..

पावसाच्या त्या थेंबात
दिसतात त्या आठवणी...

डोळ्यात अश्रू बनुनी
उभे राहतात त्या आठवणी...

दिवसाच्या त्या प्रारंभास
पहिला विचार बनतात त्या आठवणी...

रात्रीच्या त्या काळोखात
जागवतात त्या आठवणी...

कामाच्या त्या ओघात
सतावितात त्या आठवणी...

चहाच्या त्या वाफेतही
दरवळतात त्या आठवणी...

दारूच्या त्या नशेतही
धुंदावितात त्या आठवणी...

पाहत आहे वाट अजूनही तिची...
पण...आठवतात का तिला त्या आठवणी.....?...आठवतात का तिला त्या आठवणी.....
----------------शिरीष सप्रे(४-८-२०१०)-----------------------

Tuesday, July 27, 2010

पावसात जेव्हा तीही कोणासाठी तरी रडेल....

उल्हासित होते मन सर्वांचे
वर्ष ऋतूच्या आगमनाने
चातकाची ही तहान भागते
येणाऱ्या पावसाच्या त्या सरीने

झाडानाही नवीन पालवी येते
नवीन आयुष्याची संधी देते
मातीही ती सुगंधित होते
वर्षा ऋतूचे जेव्हा आगमन होते

असतो एक चालत पावसात त्या
एकांतात अन आपुल्या विचारात
नाही भान जगाचे त्याला नाही स्वतचे
कोणास ठाऊक आहे जगत तो कोणत्या जगात..

चुकांचे तिच्या खापर त्याने
स्वताच्या माथी आनंदाने फोडले
सुखाला तिच्या दारी पोहचवता
डोळ्यांनी रक्ताचे अश्रू ते ढाळले,,

भर पावसात चालतो तो एकटा
लपवूनी चेहरा जगापासून स्वताचा
दुख ते पाहण्यास वेळ कोणाकडे असते
पावसाच्या सरींत अश्रूंनाही किंमत नसते..

रडशील किती अजुनी तू रे वेड्या
आहे सुखी ती.. तोड तू स्वताच्या बेड्या
तुझ्या प्रेमाची किंमत एकदा तिला कळेल
भर पावसात जेव्हा तीही कोणासाठी तरी रडेल....कोणासाठी तरी रडेल...
---------------शिरीष सप्रे(२७-७-२०१०)--------------

Monday, July 19, 2010

बाबाही आपुले मित्र असतात..

मनात विचाराचे वादळ असे
डोळ्यात अश्रू दाटुनी उभे
सांगावे कोणाला समजेनासे झाले
या दुखातुनी बाहेर यावे कसे..

उदासी नैराश्य एकदम आले
हासर्या चेहर्याला रडवूनी गेले
हास्य चेहऱ्यावरचे नाहीसे झाले
एकटेपणाचे घर मी गाठले..

अचानक एक हाक कानावरी आली
अंधारी जीवनातूनी बाहेर काढणारी
हताश मनासी एक सामर्थ्य देणारी
उदास चेहर्यावरी हास्य उमलवणारी ...

होती हाक ती मैत्रीसाठी त्यांची
कधी न ऐकली मी गोष्ट ज्यांची
भुलवुनी चुका माझ्या सार्या
बाबांनी केली होती मैत्री माझ्यासाठी

नैराश्यात हाथ देऊनी बाहेर त्यांनी काढले
भूतकाळातील चुकांनी डोळ्यात अश्रू दाटले
ना मित्र ना मैत्रिणी कोणी कामासी आले
आज माझ्या बाबांनीच मजसी वाचवले..

चेहऱ्यावर माझ्या हास्य उमलले
नैराश्याचे जाळे ते सारे फिटले..
हताश मनासी पुन्हा एकदा
लढा देण्यासी सामर्थ्य त्यांनी दिले

जन्मदाते शेवटी आपलेच असतात
भले आपले व्हावे याच विचारात असतात
नका दुखावू त्यांसी तुम्ही कधी
बाबाही आपुले चांगले मित्र असतात...चांगले मित्र असतात...
--------------शिरीष सप्रे(१८-७-२०१०)-----------------------

Monday, July 5, 2010

आहेच मी तुझा जन्मो-जन्मांसाठी...

मीच सगळीकडे कमी पडतो..
कोणी नाही तर तूच दाखवुनी दिले मला,
बोलतेस आहे मजवरी विश्वास जास्त तुझा ..
पण ठेवत तर नाही तो खरा...

होता स्वतावरी विश्वास
म्हणुनी तुला इथे आणले...
होता सगळ्याचा विरोध याला
तरीही या घराची तुला मी केले...

सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करताना..
तुझ्या अपेक्षेचा भंग होतो..
कळते मला हि गोष्ट तुझी
घडते असे कि मीही खूप दुखावतो...

हाथ पकडला आहे तुझा मी..
तुला साथ देण्यासाठी...
नाही सोडणार साथ तुझा मी प्रिये..
आहेच मी तुझा जन्मो-जन्मांसाठी...जन्मो-जन्मांसाठी....

-----------शिरीष सप्रे(१६-१-२०१०)-----------------

प्रत्येक सेकंद..वर्षासारखा वाटत आहे..

बोलतोस मला तू..
आहे श्वासाच्या एका अंतरावर..
जाणवत नाही गंध तुझा
असलास जरी तू त्या रोमांचावर...

ठेवला होता हाथ मी..
होते ते क्षण असे...
जाववत नव्हते मला हि दूर..
पण जाणे मला भाग होते..

तुझी श्रद्धा तुझी भक्ती..
यावरच मी जिवंत आहे..
घेतलेस समजून मला तू..
तुझ्या पापनीतील अश्रू ते..
अजून माझ्या ओंजळीत आहे..

ये तू लवकर आत्ता..
जगणे कठीण होत आहे..
जाणारा तो प्रत्येक सेकंद..
एका वर्षासारखा वाटत आहे..वर्षासारखा वाटत आहे......!

--------------शिरीष सप्रे (२२-१-२०१०)------------------

चंद्र - तार्यांची साथ...

चंद्र - तार्यांची साथ हि,
असे रात्री पुरती...
आहे आपुले प्रेम जन्मो-जन्मीचे
नाही अवलंबुनी ते अंधारावरती...

सहवास हा आपला
जपला आहे माझ्या श्वासात...
नाही तुटू देणार तुला मी
मीही सामावले आहे त्याच्यात...

असतील तारे अवलंबुनी ते
त्या निशेवरती..तसेच
आहे अस्तित्व माझे हि सख्या
अवल्म्बुनी तुझ्या अस्तित्वावरती...

ठेवले आहे तुझ्या जागी स्वताला मी आत्ता
नाही होऊ देणार त्रास तुला कधी..
सोसला आहेस जो तू माझ्याकरता......
---------शिरीष सप्रे (१२-१-२०१०)-----------

Sunday, July 4, 2010

आई-बाबा तुमच्या चरणी....

आपण लहानाचे मोठे होतो पण अनेकदा आपण कडून अशा चुका होतात कि त्यामुळे आपल्या आई-वडिलांना मान खाली घालावी लागते...या चुका पुन्हा होणार नाही आणि या मातृपित्यांची मान खाली जाणार नाही...ही कविता त्या चुकांची माफी मागून.....शिरीष


दिले अस्तित्व मजसी तुम्ही
लहानचे ते मोठे केले,
काढुनी चिमटे पोटाला स्वताच्या
पोट माझे सदा भरले..

घालूनी चादर चुकांवर माझ्या
योग्य मार्गाचे मार्गदर्शन केले
येणाऱ्या संकटांची चाहूल भासताच
संकटाना त्या स्वतावर तुम्ही ओढविले..

मायेच्या त्या छत्रछायेत तुमच्या
सदा तुम्ही मला जपिले,
दुखाच्या झळीला न पोहचू दिले
सदा सुख माझ्यावर बरसविले..

प्रेमाची ती माया तुमची
कधी न मी जाणली..
तोडूनी मायेला तुमच्या सदा
दुख फक्त मी तुम्हाला दिली..

ठेवतो माथे माझे मी
आई-बाबा तुमच्या चरणी
केल्या आहेत चुका आजवरी फार
भुलवुनी आज सारे द्या मजसी माफी..

माझ्या चुकांमुळे पुन्हा कधी
डोळ्यात पाणी येऊ देणार नाही
होईल गर्व तुम्हाला ही एकदा
शरमेने मान खाली जाऊ देणार नाही.....मान खाली जाऊ देणार नाही...
-----------------शिरीष सप्रे(४-७-२०१०)----------------

Saturday, July 3, 2010

अस्थिंवर माझ्या तुझेच नाव दिसले...

नाही किंमत माझ्या शब्दांची ..
न मी केलेल्या प्रेमाची..

नाही किंमत माझ्या त्या अश्रूंची..
न मी रडलेल्या रात्रींची..

नाही किंमत माझ्या बोलीची.
न प्रेमाने मारलेल्या त्या हाकेची..

नाही किंमत तुला माझ्या वेळेची..
वाट पाहत राहिलेल्या त्या दिवसांची..

विसरलो होतो जगणे स्वतासाठी..
अन जगलो फक्त तुझ्या हास्यासाठी..

कशी ग तू अशी बनलीस स्वार्थी..
अन विसरलीस केले होतेस प्रेम माझ्यावरती..

सहज पणे नाही म्हणुनी गेलीस
डोळ्यात अश्रू आणुनी गेलीस..

प्रेमाला माझ्या असे धुडकाविले
हृदयाचे ठोके तिथेच थांबिले...

खर्या प्रेमिला या वेडे तू ठरविले...
या प्रेमी वेड्याने तुझेच नाव जपिले ..

एका हास्यासाठी स्वताला संपविले
अस्थिंवर माझ्या तुझेच नाव दिसले...अस्थिंवर माझ्या तुझेच नाव दिसले..
----------------शिरीष सप्रे(३-७-२०१०)---------------------

Monday, June 28, 2010

सारे सगळे शांत होते....

एका चुकीच्या पावलाने
घनदाट जंगलात अडकले होते
अमावस्येच्या काळोखी रात्री
वातावरण सारे शांत होते..

किर्र किर्र आवाजाने त्या
अंगावर शहारे येत होते
गवतातुनी येणारा सळसळ आवाज
अचानक सगळे शांत होत होते..

दमछाकाने वाढलेला श्वासोश्वास
सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते..
डोक्यावरी होती अघोरी रात्र
सारे सगळे शांत होते...

एकाच्या चुकीची शिक्षा
आज सारे भोगणार होते..
होता मृत्यू आज दारी उभा
सारे सगळे शांत होते..

पळायच्या वाटा सार्या
सारे मार्ग ते बंद होते..
नव्हता उपाय मृत्यू शिवाय त्यांना
सारे सगळे शांत होते...सारे सगळे शांत होते....
--------------शिरीष सप्रे(२८-६-२०१०)---------------

तिचेच प्रतिबिंब दिसले..

झोपेत पाहायचो स्वप्नसुंदरी
साक्षात आयुष्यात ती आली
येउनी बेरंगी जीवनात माझ्या
रंगांची उधळण करुनी गेली..

फुलासारखी नाजूक अशी
कोमल हास्य तिच्या गाली
होते वाटत स्वर्गात मी जणू
अशी अप्सरा मला मिळाली..

नव्याचे ते नऊ दिवस संपले
अप्सरेचे खरे रूप दिसले
टाकला होता ओवाळूनी जीव जिच्यावर
तिनेच हृदयाचे तुकडे केले..

देऊनी सर्वस्वी प्रेम तिला
दोषी अखेरीस मला ठरवले
प्रेमाच्या बुडत्या नौकेला होतो वाचवीत
अथांग सागरात मलाच बुडविले..

केले वार अनेक हृदयावरी त्या
रक्ताचे अश्रू हृदयातूनी ढळले
प्रेम माझे कधी न जाणलेस
रक्तात हि तिचेच प्रतिबिंब दिसले...तिचेच प्रतिबिंब दिसले....
--------------शिरीष सप्रे(२८-६-२०१०)-------------------

Wednesday, June 16, 2010

मुक्तता होती द्यायची ....

होते केस विखुरलेले तिचे ,
अंगावर मळकट पांढरी साडी,
स्वताशीच काहीतरी बोलायची,
एकदा एका गावात होती अशी बाई..

एकटीच अशी राहायची
दूर-दूर रानात भटकायची
पडला अंधार गावात की मग
झाडाखाली येउनी बसायची..

रात्रीचे तिला भान नसायचे
नव्हती श्वापदांची हि भीती
लोकही सारे घाबरायचे तिला
होती अशी एकदा एका गावातली स्थिती..

एकदा एका गावात रात्रीचा
कहर असा जणू झाला..
अमावास्येच्या रात्रीचा तो.
खेळ सारा पूर्ण झाला ...

पाहत होती वाट ती
अमावास्येच्या त्या रात्रीची
करुनी मुक्तता स्वताची त्या रात्री
मुक्तता होती द्यायची तिला त्या प्रेमाची..तिला त्या प्रेमाची....

------------------शिरीष सप्रे(१६-६-२०१०)------------------

Monday, June 7, 2010

अल्कोहोल - एक जीवन....

मावळताना सूर्य रोज
काहीतरी खुणावितो
आली रात्र पुन्हा आज
अल्कोहोलची आठवण देतो..

कोणी त्या शहाण्याने
अशी नशा बनविली
रात्रीपुरती का होईना
अल्कोहोलची साथ मिळाली..

प्यावी पाण्यात ती जर
अशी वेगळी येते मजा ..
मिसळली शीत-पेय तर
रात्रीपुरती होते नशा..

दुखाचा तो विसर जसा
अल्कोहोल करुनी देतो
बैठकीतच जिंकतो जग आपण
ताकद ती अल्कोहोल देतो..

विरहाच्या दुखाला त्या
अल्कोहोल भूलावितो
गेले प्रेम सोडूनी जरी
अल्कोहोल मात्र साथ देतो...

एक लार्ज पेग पिताच
तुझ्या आठवणीचा विसर पडतो
जाते रात्र पेग वर पेग पिण्यात
विरहाला या असेच मी भूलावितो..

झाली नष्ट दुनिया जरी
अल्कोहोल साथ सोडणार नाही
प्रेमातच मिळेल धोका सदा
अल्कोहोल दगा देणार नाही..

केले प्रेम जिच्यावर जीवापाड
तिने मला आज नाकारले
आले अल्कोहोल सोबतीला आज
अल्कोहोलास सर्वस्वी मी मानले...अल्कोहोलास सर्वस्वी मी मानले....
-----------------शिरीष सप्रे(७-६-२०१०)------------------------

Wednesday, June 2, 2010

प्रत्येक थेंबात तिचाच चेहरा शोधत...

मातीचा तो सुगंध दरवळला
घेउनी आनंद तो पाउस आला..

वातावरण सारे हर्षित झाले
उकाड्याचे ते दिवस संपले..

चातक हि पाणी पिऊ लागला
संगे फुलांना डोलवू लागला..

पावसात एकटा तो उभा होता
अश्रुना त्याच्या पाण्यात लपवत होता..

आठवण तिची त्याला येत होती
पावसाच्या थेंबात तिचीच प्रतिमा होती..

आनंदात सारे असे मग्न झाले
त्या वेड्यासी कोणी न पहिले..

पावसाची ती सर अशी धावुनी आली
संगे त्या प्रेमाची आठवण ताजी झाली..

असतो उभा तो अश्रू पावसात ढाळत
अन प्रत्येक थेंबात तिचाच चेहरा शोधत...तिचाच चेहरा शोधत...
-----------------शिरीष सप्रे(२-६-२०१०)-----------------

Monday, May 31, 2010

रात्र ती वै-याची होती...

अमावास्येच्या घनदाट काळोखी
दूर कुत्रे रडत होती
होत्या जाणवत यातना त्यांच्या
ती रात्र वै-याची होती..

पानांचा होणारा सूळसुळाट तो
कोणीतरी येण्याची सूचना होती
होता चंद्रही लपलेला त्यादिवशी
ती रात्र वै-याची होती..

ये- जा करणार्यांची ती वाट
आज जणू ओसाड होती..
नव्हती होत हिम्मत कोणाची
ती रात्र वै-याची होती..

पिंपळाच्या त्या झाडाखाली
एकटीच ती रडत होती..
होता आक्रोश तिच्या रडण्याचा..
रात्र ती वै-याची होती..

नव्हती मिळाली मुक्ती तिला
कोणाच्या आगमनाची प्रतीक्षा होती,
घेउनी बदला झालेल्या अन्यायाचा
मुक्ती तिला मिळवायची होती..

भंग पावत होती शांतता
किंकाळी त्याची दुमजत होती
मिळाली होती मुक्ती तिला आज
रात्र ती वै-याची होती....रात्र ती वै-याची होती...
--------------------शिरीष सप्रे(३१-५-२०१०)-------------

तिला तर दुसर्याची साथ आहे..

होते हसणे मजपाशी तुझे
खांद्यावरी डोके ठेवुनी रडायची,
आली वेळ जेव्हा प्रेमाला जपायची
केलीस तयारी माझ्या आयुष्यातून जायची..

माझ्या आवाजाने होती सकाळ तुझी
होत होता दिवसाचा शेवटही
नव्हते माहिती काय माझ्या नशिबी
होत होता माझ्या प्रेमाचा तेव्हा अंतही..

क्षणात एका दुनिया बदलली
प्रेमाने माझ्या बाजू फिरवली
धडकत होते हृदय जिच्यासाठी
तिनेच हृदयात तलवार खुपसली ..

सहज कशी नाही म्हणुनी गेली
हाथी एक प्याला थामवूनी गेली,
जाता जाता प्रेमालाही माझ्या
तू कल्पनेचे नाव ठेवुनी गेली..

आजही ती कल्पना वास्तवात आहे
वेडे हृदय तुलाच हाका मारत आहे
कसे समजावू त्यासी मी आज
तिला तर दुसर्याची साथ आहे...दुसर्याची साथ आहे...
--------------शिरीष सप्रे(३१-५-१०१०)------------

Friday, May 28, 2010

सावरकरांशी नतमस्तक होऊनी गेला..

होता अंधार चहुबाजूला
प्रकाशाचा किरण असा आला
चैतन्याचे वातावरण झाले सारे
जेव्हा सावरकरांचा जन्म झाला..

होती भूक स्वातंत्र्याची
नव्हता मनी कोणता विचार
देत होते लढा त्या इंग्रजांविरुद्ध
होते बनवले ज्यांनी देशाला लाचार..

होती लेखणीला अपार धार
वाचून लेख ते इंग्रजांवर होई वार
नव्हती पर्वा तुरुंगाची कधीही
होते जे पाठवायचे इंग्रजांना हद्दीपार..

स्वातंत्र्याचे ध्येय होते मनी
लढाच तो फक्त द्यायचा होता
शिकुनी लढ्याचे शिक्षण ते
इंग्रजांनाच धडा शिकवायचा होता..

पाहुनी ती देशभावना
सागरही न शांत बसला
ने मजसी ने च्या पुकाराने
सागराने हि लढा दिला ..

तो सूर्य आज एक
सोनेरी किरणे घेउनी आला
स्वातंत्राच्या पहाटी उगवताना
सावरकरांशी नतमस्तक होऊनी गेला...नतमस्तक होऊनी गेला..
-----------------शिरीष सप्रे(२८-५-२०१०)-----------------------

Tuesday, May 25, 2010

पूर्ण विराम दे आता...

किती रे पळशील तू सदा
जाऊन कुठे तरी थांब आता
पळकुटे पणाच्या सवयीला तुझ्या
पूर्ण विराम घ्यावा आता..

इतरांना तू सदा असा
फिरवत - फसवत राहिला
खोटे पणाच्या तुझ्या वागण्याला
पूर्ण विराम हा द्यायचा राहिला ..

उगवेल तेच जे तू पेरले
नशिबाला दोष का देतोस आता
तुझ्याच कर्माची फळे ती सारी
खोटेपणाला पूर्ण विराम घ्यावा आता..

ठेव हिम्मत स्वता मध्ये सदा
उभे आयुष्य बाकी आहे आता
देवही आहे पाठीशी उभा तुझ्या
लुच्चेगीरीला पूर्ण विराम दे आता...पूर्ण विराम दे आता...
----------------शिरीष सप्रे(२४-५-२०१०)---------------------

मुलींचे नखरे...किती करणार...

अनेकदा मुले आपल्या प्रेमाला विचारतात आणि मुली अशी उत्तरे देतात....हि कविता कोणाला हि दुखी करायच्या उद्देशाने केली नसून ती एक कविता आहे हे समजून वाचावे....शिरीष सप्रे


विचारावे कधी भेटशील का आज
"ना "च्या पाढ्याने असते सुरुवात..

जावे का ग आज कुठे जेवायला
नाहीरे पोटात जागा माझ्या काही खायला..

चल आज आपण पिक्चर ला तरी जाऊ
कशाला तो पिक्चर बघण्यात वेळ घालवू..

अरे पहिली वाट तुझ्या फोन ची मी
अरे नव्हता Balance ...नाहीतर केला असता फोन मी..

का ग आजकाल तू माझ्याशी बोलत पण नाहीस..
अरे थकलेली असते रे..वेळच मिळत नाही..

किती अशी नाटकी तुम्ही सदा करणार
प्रेमी आमुच्या सारखे फक्त वाट पाहणार....फक्त वाट पाहणार .....
---------------------शिरीष सप्रे(२५-५-२०१०)-----------------

Saturday, May 22, 2010

चूल वाट पाहत असते...

तिन्ही सांज झाली आता
कवा येशील माझ्या धनी
टाकलेत दोन घास शिजावया
तुझाच विचार रे माझ्या मनी

सुर्यालाही जाग येण्या अगुदर
कामासी तू निघतो
शेतामधी राब राब राबुनी
पोट आमुचे तू भरतो

चुलीला या दोन लाकड देण्यासाठी
जंगलाच्या वार्या तू करतो
भांड्यात या अन्न शिजवण्यासाठी
दिवसभर घराबाहीर तू राबतो

आहे रे संसार आपुला उभा
तू केलेल्या या मेहनतीने
देते आधार मी हि तुला
जमेल जसे माझ्या परीने

तिन्ही सांजेला सदा एकच गोष्ट
डोळ्यात सतत सलत असते
उपाशीपोटी राबलेल्या धानिसाठी
दोन घास देण्याची चूल वाट पाहत असते....चूल वाट पाहत असते...
----------------शिरीष सप्रे(२२-५-२०१०)--------------------

Wednesday, May 19, 2010

एका गुन्ह्याची शिक्षा -----------

२३ एप्रिल २०१० , तो आलाच नाही.रोज जो माझ्या ट्रेन मध्ये असायचा,त्याची जागा मी पकडून ठेवायचो.आम्ही एकत्रच ऑफिस ला जायचो आणि माझी होणारी वाहिनी सुद्धा दिसली नाही.खूप दिवस झाले तो आलाच नाही.त्याचा फोन हि लागत नव्हता.
श्रीकांत नाव त्याचे, उंच ,देखणा चांगली शरीर यष्टी ,हसरा चेहरा त्याचे रूप असे होते कि एक वेगळी प्रतिमा लोकांवर पडायची.त्याचे बोलणे अन तो मन - मिळाऊ स्वभाव तसेच तो कविता हि करायचा. रोज मला एक कविता वाचून दाखवायचा. तो आणि त्याची होणारी बायको दोघे हि एकाच ट्रेन ने जायचे. ती हि दिसायला सुंदर होती, म्हणतात ना लक्ष्मी - नारायण ची जोडी तशी गोड जोडी होती त्यांची.खूप प्रेम तो तिच्यावर करायचा.रोज मला एक त्याची स्वप्न, लग्नानंतर चे प्लान्स सांगायचा.कधी कधी मला हि त्याचा हेवा वाटायचा कि खरच असे कोणतरी सोबत असावे आपल्याबरोबर जसे श्रीकांत च्या जवळ होते. आमची ओळख तशी ट्रेन मधलीच अन दोघांचे ऑफिस एकाच इमारतीत होते त्यामुळे ओळख तशी चांगलीच झाली होती. ८-२० ची फास्ट ट्रेन म्हणजे आमचा भेटायचा वेळ ते १० पर्यंत अन जाताना सुद्धा तीच खोपोली लोकल. दिवसभराच्या या प्रवासात मी एक चांगला मित्र नक्कीच कमावला होता. श्रीकांत एका सोफ्टवेअर कंपनी मध्ये कामाला होता अन राजश्री (श्रीकांत ची होणारी बायको) ती एक व्यवसायाने आर्कीटेक्ट होती अन ती कुलाबा ला काम करायची. ते दोघेही ३ वर्षापासून एकत्र होते अन त्या वर्षात श्रीकांत ने तिच्याशी लग्न करायचे ठरवले होते.तसे तिलाही तो खूप आवडायचा, माझी आन श्रीकांत ची ओळख १ वर्ष जुनी होती. कधी कधी आम्ही तिघे हि हॉटेल मध्ये जेवायला किवा पिक्चर ला जायचो. त्यांना असे आनंदी बघताना मनात असे वाटायचे कि खरच या दोघांना कोणाची हि नजर न लागो.
१ जानेवारी २०१० ला त्याने मला एक अंगठी दाखवली, ती अंगठी नव वर्षाची भेट म्हणून राजश्री ला द्यायची होती. मी त्याला म्हटले आज चांगला दिवस आहे ती पण खुश होईल तू आजच दे, तर तो म्हणाला कि ती तिच्या
परिवारासोबत बाहेर गेली आहे. ती आल्यावर देईन.पण नशीब ते नाव वर्षात त्याच्या बाजूने नव्हते. मला ती गोष्ट पूर्ण माहिती नाही पण २-३ दिवसानंतर त्यांचे खूप भांडण झाले, त्यात असे कळले कि ती तिच्या कोलेज मधील मुलगा त्याच्या घरी गेली होती, मला तेव्हा काही कळलेच नाही. काही दिवसांनी श्रीकांत ने आपणहून सांगितले, कदाचित त्याला त्याचे मन हलके करायचे होते, तेव्हा असे कळले कि तिच्या कोलेज मधील एक मुलगा होता अन
दोघांच्या घराचे एक - मेकाना ओळखायचे.अन तिच्या मोठ्या बहिणीला त्यांचे लग्न व्हावे असे वाटत होते, हा सगळा भूतकाळ त्याला माहिती होता अन त्या परीस्थित त्याने तिला आपले केले होते पण अचानक या गोष्टी मुळे तो जरा तुटला होता.तेव्हा त्याच्याशी बोलताना असे कळले कि भूतकाळातील त्या मुलाच्या घरच्यांना राजश्री कडून खूप अपेक्षा होत्या अन ते आपली सून समजून चालत होते, राजश्री ला मात्र तो आवडत नव्हता कारण जेव्हा जेव्हा तिला गरज होती तेव्हा तेव्हा श्रीकांत असायचा तिच्या सार्या अपेक्षा म्हणा किवा एकटेपणा म्हणा ते सारे श्रीकांत ने दूर केले होते, पण आज अचानक तो भूतकाळ वर्तमान बनून सामोरी आला. श्रीकांत ला वाटले कि हीच वेळ आहे आता राजश्री च्या घरच्यांना मागणी घालायची, कारण इतके जुने प्रेम त्याला विसरणे सोपे नव्हते, आज त्याच्या प्रत्येक गोष्टीत ती सामावलेली होती, अन तिच्याशिवाय जगणे आज मात्र त्याला मान्य नव्हते. तो नेहमी म्हणायचं असे प्रेम करावे कि गेल्यानंतरही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपली नजर सोडून जावे. त्याने राजश्री च्या
घरच्यांना विश्वासात घायचा प्रयत्न केला, राजश्री ला दोन मोठ्या बहिणी होत्या त्याने आळी पाळीने दोघींना भेटला अन आपले प्रेम व्यक्त केले, पण त्यात त्याच्या हातही निराशा आळी, दोघींनी हि आपली मते त्याला वैभव (राजश्री च्या भूतकाळातील मुलगा) याच्या बाजूने मांडली.तो विनवण्या करू लागला कि मला एकदा संधी द्या मी खुश ठेवीन तुमच्या बहिणीला पण तरीही त्याने त्याचे काही हि ऐकले नाही. श्रीकांत ला असे वाटू लागले कि कोण नसले तरी राजश्री त्याच्या बाजूने आहे अन याच एका आधारावर तो लढत होता.
२३ मार्च २०१० राजश्री च्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस, ती घरी असल्याने श्रीकांत अन राजश्री चे काहीच बोलणे नाही झाले, पण दुसर्या दिवशी आपण भेटणार हे माहिती असल्याने तो शांत होता,मधल्या काळात राजश्री
चे वागणे देखील बदलले होते, श्रीकांत त्यामुळे खूप काळजीत असायचा,२४ तारखेला नेहमी प्रमाणे तो तिच्या घराजवळ उभा राहिला ती येण्याची वाट बघत, ती आलि...तिला येताना पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली..ती एकटी नव्हती तर सोबत वैभव होता,काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते, अन ती श्रीकांत ला न बघता निघून गेली.श्रीकांत ने फोन केले पण एकही फोन तिने पिक नाही केला, श्रीकांत ला काय करावे काहीच सुचत नव्हते,श्रीकांत फोन वर फोन करीत होता पण तिने एकही फोन नाही उचलला. शेवटी त्या मुलाने फोन उचलला अन श्रीकांत ची अन त्याची बाचाबाची झाली. आज त्याला भेटायचे अन सगळे काही सांगायचे असे त्याने ठरवले होते.श्रीकांत ला राजश्री चा जेवढा राग आला होता तेवढाच राग त्या मुलाचा आला होता, त्याला भेटून तो सोक्षमोक्ष नक्कीच लावणार होता,अन तसा तो भेटला, राजश्री आज तरी आपल्या बाजूने उभी असेल असा त्याला विश्वास होता पण तिने सहज पाने " श्रीकांत मी तुझ्याबरोबर नाही लग्न करू शकत, प्लीज मला या पुढे त्रास देऊ नको.." असे म्हटले.श्रीकांत ने एका फाईट मधेच त्या वैभव ला आडवे पडले असते पण जर आज त्याचे प्रेमच त्याच्या बाजूने नाही म्हटल्यावर तो तरी काय करणार. " तुम्ही दोघे खुश राहा.." असे म्हणून श्रीकांत तिथून निघून गेला, डोळ्यात पाणी..स्वप्नाचा चुरा अन तिच्यासाठी केलेली अंगठी याच तीन गोष्टी आत्ता त्याच्या जवळ उरल्या होत्या..काय करावे काहीच सुचत नव्हते, पण श्रीकांत ला हार मानायची नव्हती,खरेच प्रेम केल्याचे हेच फळ असते का..ती व्यक्ती खरच सोडून जाण्यासाठी आलेली असते का?असे प्रश्न माझ्या मनात आले...कारण
श्रीकांत ने तिच्यासाठी सारा जीव लावला होता, तिच्या छोट्या न छोट्या गोष्टींची काळजी त्याने घेतली होती,जेवढे प्रेम तिच्या घरच्यांनी तिच्यावर केले नव्हते त्याहुनी अधिक तो तिच्यावर करायचा,त्याला राजश्री ला एकटे भेटायचे होते जरी ते शेवटचे का असेना, त्याला मात्र तिला भेटायचे होते...
२ एप्रिल २०१० त्याने हाल्फ डे घेतलं ऑफीस मधून अन तो तिच्या ऑफिस च्या इथे गेला. दुपारचे २ वाजता तिचा लंच होतो म्हणून तो त्या वेळेत तिथे पोहचला. त्याने तिला फोन करून सांगितले कि मी तुझी वाट पाहत आहे ऑफिस खाली जमले तर ये, पण तिने मात्र फोन ऑफ केला.श्रीकांत ने खूप प्रयत्न केले पण तिचा फोन ऑफ लागत होता.२ चे ४ झाले दोन तास झाले तरी तिचा फोन ऑफ होता.शेवतो कंटाळून श्रीकांत ने तिच्या ऑफिस मध्ये फोन केला आणि तिला फोनवर बोलावले. त्याला फक्त तिला एकदा भेटायचे होते आपले प्रेमाचे नाते
वाचवायचे होते, एक वेडेपणा होता पण तसेच त्याचे प्रेम हि तेवढेच पवित्र अन सच्चे होते.संध्याकाळचे ७ वाजले श्रीकांत ला ५ तास झाले होते उभे राहून पण तरीही ती काही आलि नाही,त्याने तिला फोन केला तर कॉल वेटिंग वर
यायचा अन मग ती पुन्हा फोन बंद करायची, त्याला काहीच समजत नव्हते ७ चे १० वाजले अन आत्ता मात्र श्रीकांत चा संयम सुटत जात होता, आठ तास तो तिच्या ऑफिस खाली उभा होता पण तिने फोन उचलला नाही, कॉल झाले मेसेज केले तरी काही प्रतिसाद नाही, शेवटी कंटाळून त्याने ऑफिस मध्ये कॉल केला,तेव्हा कळले कि ती तर ७ वाजताच गेली होती. श्रीकांत ला प्रश्न पडला कि ८ तास तो तिच्या ऑफिस च्या खाली उभा आहे तरी हि त्याला ती दिसली कशी नाही , तर चौकशी करताच त्याला असे समजले कि ती दुसर्या प्रवेशद्वाराने बाहेर पडून गेली. श्रीकांत चे डोके फिरले होते, त्याने सी. एस. टी वरून शेवटचा कॉल केला तर तो हि तिने कट केला.
रात्रीचे १०-३० झाले होते तेवढ्यात श्रीकांत चा फोन वाजला, त्याला वाटले तिचा आहे त्याने उचलला कारण तो नंबर लेंड लाईन वरचा होता,तो कॉल उचलल्यावर त्याला एक धक्काच बसला कारण तो कॉल पोलीस स्टेशन मधून होता. अन त्याला बोलावले होते कारण राजश्री ने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्याला दोन मिनिट काही सुचलेच नाही, कि आज त्याच्या प्रेमाचे फळ त्याला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखील होऊन मिळाले होते,
त्याने ट्रेन पकडली अन ११-४० ला पोलीस स्टेशन ला पोहचला.रात्रीचे बारा वाजत आले होते, पोलीस कसे बोलतात अन कसे वागवतात याची कल्पना त्याला होती,पण तरीही तो त्या धक्क्यात होता,चांगले व्यक्तिमत्व असल्याने
पोलिसांनी त्याच्याशी नम्रतेने बोलायला सुरुवात केली, एक सोफ्टवेअर कंपनी मध्ये असलेला मुलगा आज पोलीस स्टेशन मध्ये बसला होता अन त्याचे कारण होते कि त्याने अफाट प्रेम केले होते.खूप चर्चा झाली, शिवीगाळ झाली अन श्रीकांत ने ति केस दाबली. तरीही त्याचा विश्वास बसत नव्हता कि राजश्री असे काही करू शकते, पण जेव्हा फॉर्म वर सही करताना त्याने राजश्री ची सही पहिली तेव्हा त्याच्या डोळ्यातून एक अश्रू पडला,स्वप्ने तुटली
होती,हृदयातून रक्त वाहत होते अशी त्याची अवस्था झाली होती,त्याने सही केली... राजश्री ने आपली तक्रार केली हा विचार मनातून जाताच नव्हता, एका क्षणासाठी सारे प्रेम त्याला आठवत होते,पोलीस स्टेशन च्या बाहेर पाऊल
टाकताना त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आलि अन तो पडला..
आज मी त्याच्या घरी गेलो, तेव्हा कळले कि तो त्यादिवशी जो पडला तो कधी उठलाच नाही, आज मला त्याच्याकडे बघवत नाही,आज तो एक मानसिक रुग्ण झाला आहे,हाथात अजूनही ति अंगठी आहे अन एका वेगळ्याच विश्वात तो हरवला आहे...त्याच्या प्रेमाची किंमत किती तिने ठेवली हे मला माहिती नाही पण त्याच्या प्रेमाला शिक्षा कशी तिने केली हे मात्र मी कधीच विसरू शकत नाही..त्याचे जग आज तिथेच थांबले आहे,तो वेळ अजूनही तिथेच अडकला आहे,अजूनही तो वेडा प्रेमी ति एकदा तरी येईल याच प्रतीक्षेत आहे.........................शिरीष सप्रे(९-५-२०१०)

Monday, May 10, 2010

थोड पाणी पिऊ दे...

करितो धावा तुझा देवा
आता तरी हाक माझी ऐक
बरसुनी पाउस एकदा तरी..
येउदे या जमिनीवर पिक..

झाले वर्ष किती अशी
आहे कोरड या जमिनीला
मारुनी हाका तुला अनेक
कोरड पडलीये या घशाला ..

दोन घास खायची आम्हा
आहे आज मारामार..
बरसव पाउस आत्ता तरी
होतीये आमुची उपासमार..

चातकासारखे डोळे माझे
नभाच्या पाण्याकडे लावले
ढाळूनि अश्रू या दुष्काळात
अश्रू हि आज माझे संपले..

शेतकरी बनुनी मी आज
काय असा गुन्हा केला
राहुनी उपाशी पोटी सदा
तुझाच तर मी धावा केला

आहे शपथ तुला माझी
पावसाचा तो वर्षाव होऊ दे
येउनी वर्षा या कोरड जमिनीवरती
आज धरतीला हि थोड पाणी पिऊ दे..थोड पाणी पिऊ दे...

-------------------शिरीष सप्रे(१०-५-२०१०)-----------------------

Tuesday, May 4, 2010

तुझ्या उत्तराची वाट मी पाहतोय...

चमत्कार माझ्या जीवनात
आज असा काही झाला..
हृदयाची ती बाजू ऐकायला
एक व्यक्ती अचानक आला..

दैवी चमत्कार हा असाही असतो
शोधात असतो आपण कोणाला
दूत बनुनी एक व्यक्तीला तो
आपल्या जीवनात पाठवतो..

एक-दोन आठवड्यांची ओळख
इथवर जाऊन पोहचली..
वाटले जणू मनाला असे
कित्येक वर्षे आम्ही एकत्र काढली..

वाटते मनाला आज असे..
सोबत तिच्या सदा रहावे..
आयुष्यातील सुंदर क्षण ते
तिच्यासोबतच घालवावे..

प्रेमाच्या त्या वाटेवरती
आज मी उभा राहिलो..
आयुष्याची साथ मिळण्यासाठी
प्रेमाचे घर ते बांधुनी आलो..

माझ्या चेहऱ्यावरचे हास्य
आज तू बनशील का..?
स्वप्नात येउनी माझ्या तू..
माझे गोड स्वप्न बनशील का..?

आयुष्याची साथ मिळायची
संधी आज मी मिळवतोय..
विचारला प्रेमाचा तो प्रश्न..
तुझ्या उत्तराची वाट मी पाहतोय...उत्तराची वाट मी पाहतोय...

--------------------शिरीष सप्रे(४-५-२०१०)------------------

Saturday, May 1, 2010

बापाच्या मांडीवर डोक ठेवुनी तू बघ...

आज तरी बापाच्या मांडीवर
डोक ठेवुनी तू बघ
आहे प्रेमाचा ओलावा त्यात,
तो ओलावा आज तू घेऊन बघ..

तो हि तुझाच विचार करत असतो
रात्र-दिवस लढताना तुला पाहत असतो
अपयशाची तू पायरी चढताना..
तो हि मनातल्या मनात रडत असतो...

स्वताच्या पायाची वहाण तुला देताना
मित्र त्याने तुला बनवले
येणाऱ्या त्या संकटाना लढण्याचे
सामर्थ्य तुला त्यांनी दिले...

त्यांच्या प्रत्येक ओरडण्याला
मनाशी तू लावूनी घेतले
आहे प्रेम तुज बद्दल किती
ते तू कधी न जाणलेस...

ओरडतो माझा बाप किती
असे म्हणुनी तू भडकत राहिलास
बापाच्या डोळ्यातून ओघळणारा अश्रू
एकदाही तू न पाहिलास...

तुझ्या त्या शिक्षणासाठी
पै पै त्याने जोडले..
तुला सुखसोयी देताना
स्वतच्या इच्छांना त्याने मारले...

आहेस तूच उजवा हाथ म्हणुनी
जगाला अभिमानाने सांगितले
करुनी भांडणे बापाशी त्या
त्यालाच शरमेने तू लाजीवले ...

समजतील तुलाही तुझ्या चुका
होशील जेव्हा तू कोणाचा बाप
दुखावूनी बापाच्या भावनांना तेव्हा
होते केलेस किती महापाप....

ओलावा त्या प्रेमाचा
अहूनही मिटला नाही
बापाच्या मांडीवर ठेव डोके,
संधी ती अजूनही गेलेली नाही...गेलेली नाही......

---------------------शिरीष सप्रे(१-५-२०१०)---------------------

Thursday, April 29, 2010

चंद्र हि तिच्यावर बरसला...

होता चंद्र आज खिलला
त्या निरभ्र आकाशी,
माझेच होते मला माहिती
काय बोलत होतो मी त्याच्याशी ..

सहजच आज मी
तुझ्या विषयी त्याला विचारले ..
हसत म्हणाला मजसी तो ..
आहे माझ्यातच तिचे हास्य सामावले ..

माझ्याशी हि ती
तुझ्याबद्दल बोलते..
आहेस कसा तू
सदा मला विचारते..

आज विचारतेस मजला त्याच्याविषयी
कशाला देऊ या प्रश्नांची उत्तरे ..
आहे कशी अवस्था त्याची..
का सांगू मी सारे तुला खरे..

दुरावत होतीस त्याच्यापासून तेव्हा
त्याच्या प्रेमाची कदर तू न केलीस
आज नाही तुझ्याबरोबर तो तर,
का मज जवळ त्याची विचारपूस केलीस...

होते त्याचे प्रेम तुजवर..
तुझ्याबद्दल मजशी तो बोलायचा..
आहे तो काळा डाग मजवर..
म्हणुनी सदा, मला तो चिडवायचा..

नाही मिळणार ग मुली,
त्याच्यासारखा तुला कोणता सखा..
आहे प्रेम अजूनही तुजवर त्याचे,
माझ्याकडे पाहुनी रडतोय बघ तो कसा..

वेडेपणा माझा पाहुनी,
आज चंद्रही न शांत बसला
होणारी माझी हि तडफड पाहून,
आज चंद्र हि तिच्यावर बरसला...चंद्र हि तिच्यावर बरसला...

------------------------शिरीष सप्रे(२९-४-२०१०)-----------------

Tuesday, April 27, 2010

कर निश्चय मनाशी आता...

आला हा सूर्य घेउनी एक नवीन पहाट
नव्या दिशेने करायची वाटचाल तुला आज ...

जा तू विसरुनी भूतकाळ सारा,
नव्या संधीचा गंध गुजतोय आसमांत सारा..

सोड त्या चुका भूतकाळात ज्या केल्या,
आयुष्य सुंदर हे जगायला का तू विसरला...

खंबीर असे मन तुझे नको डगमगू तू देऊस,
काळजीत आहेत जे तुझ्या,नको आज तू दुरावूस..

आहे खूप सार्या गोष्टी आयुष्यात या अनुभवायला,
अन एका वादळातच का लागली नौका बुडायला ..

आहे पंखात बळ तुझ्या, घे तू उंच भरारी ,
टाक हवेला भेदुनी त्या , गुंजू दे तुझी डरकाळी ..

करीन स्वप्न पूर्ण सारी,निश्चय मनाशी आज कर,
राहा पुन्हा उभा हिमतीने,लढायला स्वताला तयार कर..

पहिले आहेत स्वप्नं, तुझ्या घरच्यांनी खूप सारी,
आज त्या स्वप्नपुर्तीन्साठी कर आयुष्याला सुरुवात खरी...

आहे तो देव आज तुझ्या पाठीशी उभा,
सदैव तू जिंकत राहावे, कर निश्चय मनाशी आता...कर निश्चय मनाशी आता...
-----------------शिरीष सप्रे(२६-४-२०१०)---------------------

हृदय ते चिरते...

होतो उभा त्या दारापाशी
हताश अन मनी विचारांच्या गाठी..
नव्हते माहिती मनाला माझ्या आज ..
येशील का ग प्रिये तू माझ्यासाठी..

मिनिटांचे तास ते बघता बघता झाले..
उभ्या उभ्या आठ तास मी घालवले..
होते केले प्रेम कोणी एके काळी..
त्याच प्रेमाने संकट आज ते ओढावले...

कशी हि दुनिया अशी स्वार्थी झाली..
धोक्याची ती गोळी मजवर झाडली
प्रेमाचे रूप ते तू न ओळखले,
छळाचे कारण देऊनी मज आज हटविले..

शेवटचे आज पाहायचे होते तुला,
भेटुनी तुज आज काही होते सांगायचे मला
भेटायची संधी ती मज न मिळाली,
माझ्या या प्रेमाची गुन्ह्यात दाखल झाली..

निस्वार्थी प्रेमाची हीच शिक्षा असते,
सदा अश्रू ढाळणे हेच नशिबी असते,
प्रेमभंग हि यातना असा धक्का देते,
सांडूनी रक्त सारे हृदय ते चिरते...हृदय ते चिरते...
-----------------शिरीष सप्रे(२६-४-२०१०)---------------

Friday, April 16, 2010

कविता मला सुचत नाही..

वाहिलेले शब्द ते मला वेचता येत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

प्रेमाचे ते बोल मला समजत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

असते ओढ कशी तुला ती जाणवत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

आठवणीचा खेळ तो मी विसरत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

वाहिलेल्या अश्रूंचा हिशोब तो लागत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

जगलेल्या रात्रींचे गणित ते लागत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

वाट पाहिलेल्या तासांची आकडेमोड सुटत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुटलेल्या प्रेमाचे प्रतिक ते जुळत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुझ्यात अडकलेली वेळ ती पुढे सलत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुझ्या हास्याची कोर चंद्रावरही दिसत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

पावसातल्या सरींमध्ये अश्रू माझे लपत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..कविता मला सुचत नाही...

------------------------शिरीष सप्रे(१६-४-२०१०)----------------------

Wednesday, April 14, 2010

गेलीस क्षणात सोडून...

गेलीस क्षणात सोडून
ठरवलेली साथ न देऊन

गेलीस क्षणात सोडून
स्वप्नांचा तो चुराडा करून..

गेलीस क्षणात सोडून
रात्रीचे मला जागे ठेवून..

गेलीस क्षणात सोडून
डोळ्यात माझ्या अश्रू देऊन..

गेलीस क्षणात सोडून
विसरुनी जा असे सांगून..

गेलीस क्षणात सोडून
एकदाही मागे न बघून..

गेलीस क्षणात सोडून
वचन ते सहज तोडून..

गेलीस क्षणात सोडून
मृगजळाची जाणीव करून..

गेलीस क्षणात सोडून
जीव हि न राहिला तुला जाताना बघून...तुला जाताना बघून...

-----------------शिरीष सप्रे(१३-४-२०१०)-----------------

Saturday, April 10, 2010

आहे मी त्या आकाशी..

करितो प्रेम तुझ्यावर, तुझ्यावरच जीव असतो
तुझ्या एका हास्यासाठी, जोकर मी बनत असतो
असेच ते हास्य टिकावे,याच प्रयत्नात मी असतो
सांग तू मला, मी कसला तुला त्रास देतो...?

येणाऱ्या त्या प्रत्येक संकटा समोर,रोवुनी पाय मी उभा असतो
सुख दारी तुझा पोहोचवताना दुख मी पचवत असतो
दुखाचे ते वार घेउनी सदा तुझ्या समोर हसत असतो
सांग तू मला, मी कसला तुला त्रास देतो ..?

कामाच्या त्या निमित्ताखाली,तुझे मला टाळणे असते
आवाज तुझा ऐकण्यासाठी माझी तडफड होत असते
असुनी माहिती सारे, मीच समजुनी घेत असतो
सांग तू मला, मी कसला तुला त्रास देतो..?

त्रास देतो कारणांनी या, माझ्यापासून तू दुरावालीस
वाट पाहत राहिलो पूर्वेला, अन पश्चिमेला तू गेलीस
दुरावा तो मिटवायच्या वाटा मी शोधात असतो
सांग तू मला , मी कसला तुला त्रास देतो..?

त्रास देणारा तो मी आज दूरदेशी आलो आहे
माझ्यामुळे होणारा तो त्रास, मी आज संपवत आहे
झाली आठवण माझी कधी, नको विचारूस या जगाशी
वरती पाहुनी बघ एकदा, आहे मी त्या आकाशी...आहे मी त्या आकाशी....

----------------शिरीष सप्रे (९-४-२०१०)-----------------------------------

Thursday, April 8, 2010

नवीन जन्म मी घेणार.....

प्रेम हे जडताना वय पाहत नसत...
प्रेमात तर सारे सगळ माफ असत..

असेच प्रेम मला हि एकदा झाले...
प्रेमात आमुच्या वयाचे फरक निघाले..

होती प्रेमाची कळी हृदयात उमललेली..
पण समाजाला हि कहाणी न पसंद पडलेली..

नव्हती चिंता मला त्या निष्ठुर समाजाची..
होती भीती कि ती येईल का माझ्यासाठी..

पहिले होते भविष्य आमुचे एक-मेकां सोबत..
निष्टुर अशा समजामुळे माझ्याशी ती नव्हती बोलत...

दाबला आमुच्या प्रेमाचा गळा या समाजाने..
टाकले चीरडूनि कळीला त्या मोठ्या कठोरतेने...

संपणार नाही प्रेम आमुचे असला दाबला जरी गळा..
पाहुनी आमुची प्रेम कहाणी रडतीला सारे ढळा ढळा...

प्रेमाचे ते फुल आहे पुन्हा एकदा उमलणार...
येईन पुन्हा मी एकदा..नवीन जन्म मी घेणार...नवीन जन्म मी घेणार.....

----------------शिरीष सप्रे(७-४-२०१०)--------------------

तुझी याद आली...

होता गोडवा पहाटेच्या किलबिलाटात..
होता थंडावा सकाळच्या त्या वातावरणात..
अशीच एक थंड हवेची झुळूक आली...
कसे सांगू तुला..तुझी याद आली...

निसर्गाची ती किमयाच न्यारी...
कराल प्रेम जेव्हा तुम्ही कोणावर...
जाऊन दुसर्यालाच मिळते ती नारी...
अशीच फजिती माझी हि झाली तेव्हा तुझी याद आली...

वेचिले ते शब्द तुझे समजुनी मी ती फुले...
नाही होणार त्रास तुला आत्ता माझ्या प्रेमामुळे...
तुझ्या त्या हास्यासाठी वाट मी माझी बदलली...
एकांत अशा वाटेवर तुझी याद आली...

नाही कळू देणार तुला माझ्या हृदयाचे हुंदके...
अजूनही त्या वळणावर वाट मी पाहत असे..
नशिबाने एक चेष्टा अशी मजवरी केली...
मरणाच्या त्या कुशीत जाताना तुझी याद आली....तुझी याद आली...

------------------शिरीष सप्रे(७-४-२०१०)----------------

Wednesday, April 7, 2010

तुला लिहायचे ते लिहून टाक..

तुला लिहायचे ते लिहून टाक..
शब्दांनी वार एकदाचे मजवर करून टाक..

किती ढाळले अश्रू किमती माझ्यासाठी..
हिशोब मला तो देऊन टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक...

जागलेल्या रात्रीतील आठवणी
मला तू एकदा सांगून टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक..

तू केलेल्या प्रेमाची किंमत मी ठेवली किती..
माझी जागा आज मला तू दाखवून टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक..

नाही जाणले तुझ्या प्रेमाला , न त्या वचनाला..
मनातील भडास एकदाच काढून टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक..

लिहिशील किती आता..अजुनी प्रेम आहे..
त्या प्रेमाचा आज गळा दाबून टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक..लिहायचे ते लिहून टाक..

-------------शिरीष सप्रे(२९-३-२०१०)-----------

Monday, March 29, 2010

अंधाराचे जाळे ते फिटत नव्हते...

केली सुरुवात जीवनाच्या या प्रवासाला...
नव्हते माहिती कोठे नशीब नेईल मला...

परीक्षेतील गुणांसाठी मी झटायचो..
अव्वल नंबर येण्यासाठी मी लढायचो...

संपली शाळा कोलेज आले..अन
आयुष्याला असे वेगळे वळण आले..

कोलेज संपता संपता चुकांचे डोंगर झाले..
अन अखेरीस हाथी डिग्री चे चिटोरे आले ..

राहिलो लढत सतत मी एका ध्येयासाठी..
नसले नशिबात जरी तेच ध्येय गाठण्यासाठी..

नोकरीसाठी मी त्या दारो दारी फिरलो ..
अपयशाच्या रस्त्यावर मी न माझा राहिलो..

होती इच्छा पण मार्ग मजला दिसत नव्हता..
आयुष्याच्या या मार्गावर सर्वत्र अंधार होता..

मारू हाक कोणाला हेच मला उमजत नव्हते..
आयुष्यातील अंधाराचे जाळे ते फिटत नव्हते...अंधाराचे जाळे ते फिटत नव्हते...

-----------------शिरीष सप्रे(२९-३-२०१०)----------------

Friday, March 26, 2010

राहीन मी जिवंत...

नाही मी दुखी आज नसलीस जरी तू..
आहेस सामावलेली आठवणीत माझ्या तू..

उठतो मी स्वप्नांना त्या पूर्ण करण्यासाठी..
होतीस पाहिलेली स्वप्न जी माझ्यासाठी..

असतो देत लढा ती स्वप्ने वास्तवासाठी..
राहीन लढत सदा मी त्या वचनपूर्तीसाठी..

आहे तुझे हि जग वेगळे.. पाहतेस जिथून तू..
म्हणशील तू हि एकदा "आहे गर्व माझा असल्याचा" तू..

म्हणतात सारे मला..नाही हयात ती या जगात..
नाही माहिती त्यांना,आहेस जिवंत तू माझ्या आठवणीच्या विश्वात..

आहेत आठवणी जवळ खूप आयुष्य माझे घालवण्यासाठी..
राहीन मी जिवंत सदा..स्वप्न आपली पूर्ण करण्यासाठी..स्वप्न आपली पूर्ण करण्यासाठी..!

---------------शिरीष सप्रे(२६-३-२०१०)----------------------

बघ देऊन माझ्या चुकांना माफी...

दिला त्रास तुला मी क्षणोक्षणी..
रडवलेहि तुला मी पावलो पावली..
नाही ठेवले त्या सुखात तुला कधी..
जमले तर बघ देऊन माझ्या चुकांना माफी...

करत होतीस प्रेम तू मजवर खरे..
दिली तोडूनी मी तुझ्या प्रेमाची दारे..
नाही येणार पुन्हा तुझ्या आयुष्यात कधी..
जमले तर बघ देऊन माझ्या चुकांना माफी...

त्या सुखाचा नव्हतो मी हकदार..
केले होते दुर्लक्ष तुझ्या प्रेमाला वारंवार..
आहे जात तुझ्या जीवनातून सखी ...
जमले तर बघ देऊन माझ्या चुकांना माफी...

घेतले ते खापर फोडुनी माझ्या डोक्यावर..
विश्वासघाताचा कलंक लावला मी माझ्या कपाळावर..
राहशील तू त्याच्याबरोबरच आयुष्यभर सुखी...
जमले तर बघ देऊन माझ्या चुकांना माफी... माझ्या चुकांना माफी...!

-----------------शिरीष सप्रे(२६-३-२०१०)----------------------

कोकिळा तू शांत का..?

वातावरणात हा गंध बहरला..
आम्रातरूचा गंध दरवळला..
वसंत ऋतू हि आज असा बहरला..
पण कोकिळा तू शांत का..?

होते कुहू कुहुने तुझ्या संध्याकाळ..
आवाजाने त्या वातावरणात हि येई बहार..
वातावरणालाही आज तुझ्या आवाजाची आतुरता..
पण कोकिळा तू शांत का..?

मला हि वाटे तुझा आवाज ऐकावासा..
सखीला माझ्या खुश करायचा..
पाहतो वाट तुझ्या मधुर स्वराची..
पण कोकिळा तू शांत का..?

मधुर स्वराने तुझ्या मन हि खिले..
आवाजाने त्या नैराश्य दूर हटे...
मंजुळ स्वराची त्या आम्हास आतुरता..
पण कोकिळा तू शांत का..?

नको राहूस शांत आता..
तुझे हि दुख सांगून टाक..
ऐकावूनी दे जगाला सार्या..
कि आज तू शांत का..?कि आज तू शांत का..?

--------------शिरीष सप्रे(२२-३-२०१०)---------------

Friday, March 19, 2010

आई - नसशील जगात या तू..

येईन बाहेरून थकून मी..
"आई" हाक मारू कोणाला..
नसशील आई जगात या तू..
तुझे नाव मी देऊ कोणाला..

विसरू कसे प्रेम तुझे आई..
मजवर जे तू केलेस...
ओवाळूनी टाकले आयुष्य स्वताचे..
अन तुझे आयुष्य तू कमी केलेस..

कसे जगू मी तुजविना आई ..
नसशील जेव्हा तू या जगात ..
उठेल घरही खायला मला असे..
असेल उभा जेव्हा मी त्या दारात..

हसणे - रडणे होते तुजपाशी..
नसशील जेव्हा तू..बोलू मी कोणाशी..?
करायचो सुरुवात दिवसाची तुझ्या नावाने..
नाहीस तू तर..दिवसाची सुरुवात करू मी कशी..?

आहे गरज बाळाला या तुझी अजूनही..
आहे लहानच मी..असेल झालो मोठा कितीही..
नको तो पैसा मला..असला मज जवळ जरी...
एक मी असेन "आई विना भिकारी"..."आई विना भिकारी"....

--------------------शिरीष सप्रे(१९-३-२०१०)--------------------