Monday, June 28, 2010

सारे सगळे शांत होते....

एका चुकीच्या पावलाने
घनदाट जंगलात अडकले होते
अमावस्येच्या काळोखी रात्री
वातावरण सारे शांत होते..

किर्र किर्र आवाजाने त्या
अंगावर शहारे येत होते
गवतातुनी येणारा सळसळ आवाज
अचानक सगळे शांत होत होते..

दमछाकाने वाढलेला श्वासोश्वास
सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते..
डोक्यावरी होती अघोरी रात्र
सारे सगळे शांत होते...

एकाच्या चुकीची शिक्षा
आज सारे भोगणार होते..
होता मृत्यू आज दारी उभा
सारे सगळे शांत होते..

पळायच्या वाटा सार्या
सारे मार्ग ते बंद होते..
नव्हता उपाय मृत्यू शिवाय त्यांना
सारे सगळे शांत होते...सारे सगळे शांत होते....
--------------शिरीष सप्रे(२८-६-२०१०)---------------

No comments:

Post a Comment