Thursday, August 22, 2013

पहिली अन शेवटची भेट आमुची ..!

शब्दांचे फक्त बोलणे
आवाजाचे ते ऐकणे
भावना मनातील समजुनी
चित्र आपल्या हृदयी कोरणे...

एका भेटीची ओढ आम्हास
काळापासुनी लागलेली
नियतीस नव्हती मान्य ती
आशा मनो मनी दबलेली ...

तुमच्या मनातील अबोल भावना
डायरीत अन बाप्पास माहिती होत्या
होता प्रयत्न अमुचा जाणायाच्या  त्या
प्रयत्न आमुचा कमी पडत होता...

मी संग्राम अन तू देवयानी असे
अनोखे नाते नकळत जुळले
बोल त्या मालीकेसारखे असे
नकळत मनही त्याति गुंतले...

संग्राम-देवयानी गोड भेटीचा
दिवस  अखेर तो उजाडला
आसुसले मन त्या भेटीसाठी
हर एक क्षण युगासारखा सलला...

भीती, निराशा, अन आनंद
काहूर विचारांचे मनात होते
जवळ येत होती भेटीची वेळ
मनही त्या नजरेस आतुरले होते ...

विले-पार्ले स्थानकावरी आमुची
नजर एका मेकास मिळाली
क्षणात आठवल्या सार्या गोष्टी
मनात आसवांची साठवण झाली ...

वेळेचे भान आम्हा दोघासही
आज काही उरले नव्हते
दाटल्या होत्या भावना सार्या
आज फक्त तिलाच ऐकायचे होते ...

दोन-तीन तासांची भेट आमुची
जन्मो जन्माची जणू वाटत होती
झटपट घड्याळातील काटा सरकत होता
निरोपास मात्र आमुची तयारी नव्हती...

अखेर निरोपाचा क्षण असा
कर्दन काळासारखा उभा राहिला
वचन दिले होते एका-मेकास तरीही
आसवांचा पाउस निरोपी बरसला ...

कधी तुझ्या पुढे मी बाप्पा
एकही गोष्ट ना मागितली
आज पसरतो हाथ तुजपुढे
तिची ख़ुशी हीच इच्छा मनी राहिली...

पहिली अन शेवटची भेट आमुची
हृदयावरी कोरुनि ठेवली
होत्या वाटा आमुच्या वेगळ्या तरीही
देवयानी-संग्राम  नात्याची……गाठ अतूट रहिलि…
---------------शिरीष सप्रे (२२-०८-२०१३)--------------             

No comments:

Post a Comment