गुंफला होता शब्द प्रेमाचा
आज शब्द तो अधुरा राहिला...
होतो लिहित कहाणी प्रेमाची
आज कहाणी ती अधुरी राहिली...
प्रेमाच्या सागरात नौका आपल्या नावाची सोडली
अर्ध्या वाटेत नौका ही आज बुडाली...
तयारीत होता सूर्य नवी पहाट आणायला
काळोख्या रात्रींशी मैत्री माझी झाली...
डोळ्यात स्वप्नांची उमेद नवी होती
जागा त्या स्वप्नांची अश्रूंनी आज घेतली...
हसत पाहायचो वास्तवात सदा मी
आज तीच एक आठवण बनुनी राहिली...
लिखित होता विरह नशिबी माझ्या
नशिबाच्या विरोधात प्रेमाची हाव मी केली...
जुळवत होतो शब्दांना प्रेमाच्या भावनेसाठी
त्या शब्दांनीच आज प्रेमाची सांगता केली...
जुळणार नाही शब्द कवितेसाठी..न मिळणार साथ पुन्हा कधी
उरली साथ काही क्षणांपुरती ...अन...
शेवटची कविता मी लिहिली... शेवटची कविता मी लिहिली...
-----------------शिरीष सप्रे(०७-११-२०१०)--------------------------
very nice shirish......
ReplyDelete