Monday, July 19, 2010

बाबाही आपुले मित्र असतात..

मनात विचाराचे वादळ असे
डोळ्यात अश्रू दाटुनी उभे
सांगावे कोणाला समजेनासे झाले
या दुखातुनी बाहेर यावे कसे..

उदासी नैराश्य एकदम आले
हासर्या चेहर्याला रडवूनी गेले
हास्य चेहऱ्यावरचे नाहीसे झाले
एकटेपणाचे घर मी गाठले..

अचानक एक हाक कानावरी आली
अंधारी जीवनातूनी बाहेर काढणारी
हताश मनासी एक सामर्थ्य देणारी
उदास चेहर्यावरी हास्य उमलवणारी ...

होती हाक ती मैत्रीसाठी त्यांची
कधी न ऐकली मी गोष्ट ज्यांची
भुलवुनी चुका माझ्या सार्या
बाबांनी केली होती मैत्री माझ्यासाठी

नैराश्यात हाथ देऊनी बाहेर त्यांनी काढले
भूतकाळातील चुकांनी डोळ्यात अश्रू दाटले
ना मित्र ना मैत्रिणी कोणी कामासी आले
आज माझ्या बाबांनीच मजसी वाचवले..

चेहऱ्यावर माझ्या हास्य उमलले
नैराश्याचे जाळे ते सारे फिटले..
हताश मनासी पुन्हा एकदा
लढा देण्यासी सामर्थ्य त्यांनी दिले

जन्मदाते शेवटी आपलेच असतात
भले आपले व्हावे याच विचारात असतात
नका दुखावू त्यांसी तुम्ही कधी
बाबाही आपुले चांगले मित्र असतात...चांगले मित्र असतात...
--------------शिरीष सप्रे(१८-७-२०१०)-----------------------

No comments:

Post a Comment